क्रीडाताज्या बातम्यादेश विदेश
आशिया चषक दरम्यान शाहिद आफ्रिदी आणि इरफान पठाण यांच्यात वाकयुद्धाची आहुती

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. या तणावाचे प्रतिबिंब सध्या संयुक्त अरब अमिरातीतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतही दिसून येत आहे. याच दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला थेट समोरासमोर येऊन बोलण्याचे आव्हान दिले आहे.
इरफान पठाणने यावर प्रतिसाद देत, आफ्रिदीशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. पठाणने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील एका आठवणीचा उल्लेख करत सांगितले की, २००६ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना कराचीहून लाहोरला जाताना आफ्रिदी त्याच्याकडे आला आणि हलक्या शब्दांत संवाद साधला. पठाणने तेव्हा काही विनोदी भाष्य केले, ज्याचा उल्लेख आजही चर्चेत आहे.
शाहिद आफ्रिदीने मात्र पठाणचा हा दावा फेटाळला आहे. त्याने सांगितले की, “जो व्यक्ती समोर येऊन बोलतो, त्यालाच मी मानतो. पाठीमागून काहीही बोलणे सोपे आहे, पण समोरासमोर बोलणे खरी मर्दानकी दाखवते.”
इरफान पठाणनेही आफ्रिदीला प्रत्युत्तर देत म्हटले की, “लोक बरोबर बोलताय. आपल्या शेजारील देशातील माजी खेळाडू माझ्या नावाने त्रस्त आहेत.”
या वाकयुद्धामुळे आशिया चषक दरम्यान दोन्ही माजी खेळाडूंमधील सामंजस्य आणि प्रतिस्पर्धात्मकता पुन्हा चर्चेत आली आहे.




